“एक दिवा वंचितांसाठी” या मानवतावादी भावनेतून यावर्षीची दिवाळी
समाजातील उपेक्षित, वंचित आणि आदिवासी कुटुंबांसाठी समर्पित करून
“पालावरची दिवाळी” हा उपक्रम राबवण्यात आला. दिवाळी हा प्रत्येकासाठी
आनंदाचा सण असला तरी समाजातील अनेकांना आजही मूलभूत गरजांसाठी
संघर्ष करावा लागतो. या कुटुंबांपर्यंत प्रकाशाचा आनंद पोहोचवण्यासाठी
हा उपक्रम अत्यंत संवेदनशीलपणे राबवण्यात आला.
जेहुर ठाकरवाडी, कोळवाडी तांडा, आंबा तांडा, गल्लेबोरगाव आणि कन्नड
परिसरातील शेकडो आदिवासी कुटुंबांना किराणा किट, ब्लँकेट, कपडे,
स्वेटर्स, सुकामेवा, मिठाई व आवश्यक जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप
करण्यात आले. या वस्तूंमुळे अनेक कुटुंबांना दिवाळी सण आनंदात
आणि सन्मानाने साजरा करता आला. विशेषतः थंडीपासून बचाव करण्यासाठी
दिलेली ब्लँकेट व गरम कपडे ही अत्यंत उपयुक्त अशी भेट ठरली.
हा उपक्रम कर्मयोगी स्व. राजू आबा हारदे यांच्या समाजसेवेच्या विचारांना
जपणारा आणि पुढे नेणारा ठरला. त्यांनी आयुष्यभर वंचित, शेतकरी,
तांडा–पाड्यांवरील कुटुंबांसाठी केलेल्या सेवाभावाची आठवण करून देत
त्यांच्या “वंचितांच्या घरातही दिवा पेटला पाहिजे” या विचाराला
सत्यात उतरवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
उपक्रमाच्या यशस्वीतेत आभार फाऊंडेशन – राजू आबा हारदे मेमोरियल ट्रस्ट,
जीवनज्योत ट्रस्ट, आर्य समाज ट्रस्ट, तसेच रोटरी क्लब मूलुंड यांनी
महत्वपूर्ण भूमिका बजावली.
कर्मयोगी स्व. श्री. राजू आबा हारदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गल्लेबोरगाव येथे
३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आठ दिवसीय श्रीमद्भागवत कथा व अखेरचा
वर्षश्रद्धा कीर्तन सोहळा ह.भ.प. भागवताचार्य रामेश्वर महाराज मगर नावडीकर
यांच्या कीर्तनातून भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कीर्तनानंतर महाप्रसादासाठी ग्रामस्थ, भाविक व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने
उपस्थिती लावली.
या प्रसंगी ‘आभार फाऊंडेशन – राजू आबा हारदे मेमोरियल ट्रस्ट’ तर्फे
गल्लेबोरगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा व केंद्रीय प्राथमिक शाळेला
५० LPH क्षमतेचे RO फिल्टर व स्टील पाण्याची टाकी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या
शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या गरजेचा विचार करून केलेला हा उपक्रम गावकऱ्यांनी
अतिशय स्वागतार्ह ठरवला.
कार्यक्रमात ग्रामस्थ, नातेवाईक व उपस्थितांनी स्व. राजू आबा हारदे यांच्या
शेतकरी हितासाठी व समाजसेवेतील योगदानाची आठवण प्रेमपूर्वक सांगितली.
ग्रामस्थांच्या सहकार्याने हा आठ दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कर्मयोगी स्व. श्री. राजू आबा हारदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गल्लेबोरगाव येथे
३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आठ दिवसीय श्रीमद्भागवत कथा व अखेरचा
वर्षश्रद्धा कीर्तन सोहळा ह.भ.प. भागवताचार्य रामेश्वर महाराज मगर नावडीकर
यांच्या कीर्तनातून भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कर्मयोगी स्व. राजू आबा हारदे यांच्या (१ जून) जयंतीनिमित्त ‘आभार फाउंडेशन’
तर्फे गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वीच्या
विद्यार्थ्यांना टिफिन वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता-सवयी, शिस्त, आणि मध्यान्ह भोजनासाठी स्वच्छ टिफिनची
गरज याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्वच्छ डब्यातील
पौष्टिक भोजनामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती, आरोग्य व एकाग्रता सुधारते याची
जाणीव पालकांना व विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
कार्यक्रमास जगन्नाथ बापू खोसरे, विशाल खोसरे, अनिल चांदोरीकर,
विठ्ठल हारदे, सुनिता राजू हारदे, काकासाहेब बारगळ, म्हस्के मॅडम,
श्याम उगले, तुषार खोसरे, योगेश हारदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ‘आभार फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांच्या
सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
कर्मयोगी स्व. राजू आबा हारदे यांच्या (१ जून) जयंतीनिमित्त ‘आभार फाउंडेशन’
तर्फे गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वीच्या
विद्यार्थ्यांना टिफिन वाटप करण्यात आले.